फुलशेती व फळबाग करणे - काळाची गरज- डॉ. श्रीगुरे
विकसित कृषि संकल्प अभियानाचा दुसरा दिवस उत्साहात साजरा
या अभियानाचा प्रमुख उद्देश आधुनिक शेतीला चालना देणे आणि शेतकऱ्यांना उन्नत तंत्रज्ञानाची माहिती देणे हा आहे. या कार्यक्रमात कृषी संशोधन संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, तसेच प्रगतिशील शेतकरी यांचा सक्रिय सहभाग होता.
दुसऱ्या दिवशीचे ठळक मुद्दे: फुलशेती व फळबाग लागवडीचे महत्त्व – बाजारातील वाढती मागणी आणि उत्पन्नवाढीचे फायदे.
जैविक शेती आणि नैसर्गिक पद्धती – पर्यावरणपूरक व टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त उपाय.
तंत्रज्ञानाचा वापर – आधुनिक पद्धतीद्वारे उत्पादनवाढ आणि गुणवत्ता सुधारणा.
शेतकऱ्यांनी या अभियानात उत्साहाने भाग घेतला आणि त्यांच्या अनुभवांचा एकमेकांसोबत आदानप्रदान केला. या कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे डॉ श्रीगुरे, श्री राहुल डमाळे, भारतीय ऊस संशोधन केंद्र, प्रवरानगरचे डॉ थोरात, डॉ बोरसे, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ प्रवीण चव्हाण, डॉ संतोष चव्हाण,डॉ कृष्णा अंभुरे, डॉ निहाल मुल्ला,प्रशांत शिवपनोर, बालाजी चंदापुरे, प्रभूदास उडतेवार, संतोष लोखंडे उपस्थित होते. #ViksitKrishiSankalpAbhiyan #kvksagroli #kvk #agriculture #nanded #farmer #farming
सगरोळी, 30 मे 2025 – शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेतीसाठी फुलशेती आणि फळबाग लागवड अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. विकसित कृषि संकल्प अभियानाच्या दुसऱ्या दिवशी बेळकोणी बु., बेळकोनी खु., कासराळी, कार्ला खू. ,कार्ला बू व माचनुर येथे विविध विषयावर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
0 Comments