भाजीपाला पिकामध्ये शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर या विषयावर प्रक्षिक्षण..

 भाजीपाला पिकामध्ये शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर या विषयावर प्रक्षिक्षण..


संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत केदार वडगाव ता कंधार येथे भाजीपाला पिकामध्ये अर्का शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर या विषयावर प्रक्षिक्षण आणि प्रथम रेषीय प्रात्यक्षिक घेण्यात आले. भाजीपाल पिकामध्ये चांगली प्रतीचे आणि जास्त उत्पन्न मिळण्यासाठी शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर करणे गरजेचे असते, त्या अनुशंगाने केदार वडगाव येथे भाजीपाला पिकामध्ये शुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर करणे या तंत्रज्ञानाचा प्रथम रेषीय प्रात्यक्षिक घेण्यात आले. या अंतर्गत गावतील एकूण १३ शेतकर्यांना अर्का शुक्ष्म अन्नद्रव्य फवारणी करण्यासठी वाटप करण्यात आले. सदरील शुक्ष्म अन्नद्रव्य हे वांगी, टोमाटो, मिरची आणि भेंडी या पिकावर उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त आहे. यामुळे पिकाची फुल धारणा आणि फळ धारणा चांगल्या प्रमाणात वाढून उत्पन्नात १५ ते २० % वाढ होते. या साठी लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनी पहिली फवारणी व त्यानंतर दर २५ दिवसाच्या अंतराने दोन पाण्याची शिफारस आहे.

Post a Comment

0 Comments